http://abideinself.blogspot.com/2011/03/blog-post_10.html
This link in reply to the Unknown friend is not accesible now. Why this link (post)is removed from the blog?
I read it once and found it extremely meaningful with deeper insight. Could you please upload this post once again?
Thanks
]]>http://abideinself.blogspot.com/2011/03/blog-post_10.html
सप्रेम नमस्कार!
]]>१. अध्यात्माचा 'मी आणि माझी मुक्ती' आणि बोध होणे, ज्ञान होणे इतकाच मर्यादित, संकुचित पाया नाही. त्यापुढे भगवद्गीता ३.२५ – ३.२६ हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. पण लक्षात कोण घेतो? त्यामुळे अध्यात्माच्या नावाखाली सगळीकडे तथाकथित 'अपनी धून मे मस्त' धीन्गाड्या 'मुक्तात्म्यांचा' धिंगाणा चालू आहे.
२. सत्याचा बोध झालेला नैतिक आणि अनैतिक याच्या पलीकडे असतो हे तत्वत: खरे आहे. पण असे देही असोनी विदेही उन्मनी मुक्तात्मे विरळेच असतात. त्यामुळे परिपूर्ण धर्मविचारात निव्वळ अमूर्त संकल्पना, 'फक्त बोध हवा, बास' इतकेच पुरेसे नाही. त्याची परिणती कळत नकळत सामान्यांचा बुद्धिभेद होणे, देव देश आणि धर्म यासाठी कार्य करणार्यांचे नाहक अवमूल्यन होणे आणि बसल्या जागी विश्वात्मक बुद्धी करत भोगलोलूप, पिसाट, धूर्त, आणि बोलबच्चन दुकानदारांनी अध्यात्मातले अध्वर्यू म्हणून मिरवणे यात होते. असो.
]]>सत्याचा कधीही आणि कोठलाही आग्रह असू शकत नाही. असत्याचा मात्र कायमच कोठलातरी आग्रह असतो अन्यथा असत्याच्या उपस्थितीवरच प्रश्नचिन्ह् लागू शकते. सत्याचा निकष लावणे स्वाभाविकच अशक्य आहे कारण हा निकष लावणार तरी कोण! "सत्य" स्वतःचेच स्वरूप म्हणून कायमचे उघड झाल्याशिवाय ते शक्य नाही. पण गंम्मत आशी आहे की हे उघड झाल्यावर एकतर त्याचा निकष लावायची गरजच मुळी ऊरत नाही आणि दुसरे म्हणजे कोणी त्याचा निकष लावायला जरी गेले तरी त्याचे देखील दु:ख वाटत नाही :-)!
पुनश्चः आभार आणि सप्रेम नमस्कार!
]]>Best Regards,
]]>नमस्ते. बोधाबद्दल सोप्या भाषेत आपण समजावून दिले आहे. बोध हां आपण सतत बुद्धित साठवण्यापलिकडे स्वरुप बोधाचा उलगडा होण्यास मदत होते हे आपल्या निवेदनावरून उघड
होत आहे ह्याची जाणीव आपण चांगल्या शब्दात उदृत केलि आहे. आपणाला लिहिणे सहज जमते
आणि असेच सतत लिहित रहावे. जय सद्गुरु! सर्वांना यथायोग्य
-नंदा काका
]]>